देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने भीषण हाहाकार उडवला आहे. एकीकडे योगी सरकार परिस्थिती 'खुशाल' असल्याचा दावा करतेय. प्रत्यक्षात लसीकरण केंद्रे व रुग्णालयांच्या आवारात नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे. स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र चिता पेटत आहेत. जेथे पहावे तेथे प्रेतांचा खच आणि क्षणोक्षणी घुमणारा अॅम्ब्युलन्सचा आवाज. या वास्तव परिस्थितींची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे योगी सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार असताना उत्तर प्रदेशातील जनतेच्या मरणयातना दूर का होऊ शकत नाहीत?
योगी सरकारला लॉकडाऊन नको
उत्तर प्रदेशच्या पाच शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले, पण योगी सरकार त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने आता या लॉकडाऊन आदेशाला स्थगिती दिली आहे. सरकारने यानंतर वीकेण्ड लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.
Disclaimer
This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Saamana